Sunday 21 August 2016

पण तरंग नाहीत

प्रश्न निवलेत सारे
गुंता उरलेला नाही
कोलाहल मंदावला
डोळ्यांमधे अश्रू नाही

अथांगच जलाशय
पण तरंग नाहीत
खडे पडले तरीही
थेट पोचती तळात

याचसाठी होता खरा
सारा अट्टहास केला
मख्ख स्वस्थतेत पण
जीव रमेनासा झाला

संघर्षांच्या पैलतीरी
पोचण्याची किती घाई
म्हणताही येत नाही
रितेपणाला विठाई..!
***
आसावरी काकडे
२०.८.२०१६

No comments:

Post a Comment